प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषि विभागाकडून आवाहन

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि १८ जुलै २०२५):-याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या 9 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू आहे.  15 जुलै अखेर जिल्ह्यातील केवळ 2400 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.   जिल्ह्यामध्ये  पावसाच्या संततधारेमुळे बहुतांश ठिकाणी मशागतीची व पेरणीची कामे खोळंबली आहेत.  ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे. तेथील पिकाचे सततच्या पावसाने नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, इत्यादी कारणाने नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै अखेर या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले  आहे.

बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तीकरित्या आपले अर्ज  विमा कंपनीस सादर करुन अथवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारेही या योजनेत सहभागी होऊ शकतील  योजनेत सहभागी योजण्यासाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे. त्या बँकेत  जाऊन अथवा पोस्ट कार्यालय, विमा कंपनी एजंट किंवा सर्वाजनिक सुविधा केंद्र व विमा कपंनीच्या संकेतस्थळाद्वारे 31 जुलै 2025 पूर्वी हप्ता भरावा.  अधिक माहिती साठी गावपातळीवरील सहाय्यक कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!