(वरील दोन्ही बेवारस मनोरुग्ण आजी सोबत डावीकडून राजेंद्र गावडे पाटील, आसरा केंद्राच्या सर्वेसर्वा स्वातीताई डिंबळे, रमेश दादा गावडे,पै दिपक चव्हाण.)
फलटण टुडे (गोखळी प्रतिनिधी):
एक आठवड्यात बारामतीतील ” दोन बेवारस” मनोरुग्ण महिलांना मिळाला हक्काचा निवारा. बारामती – भिगवण नजिकच्या वंजारवाडी येथे वयोवृद्ध अंदाजे ५५ वयोगटातील एक महिला बेवारस स्थितीत वावरत असल्याचे एक फोन आल्यानंतर गोखळी ता.फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते राजू गावडे पाटील, रमेश दादा गावडे,पै.दिपक चव्हाण यांनी त्वरित भेटून सदर महिलेस पाच सहा महिन्यांपूर्वी आधार देण्याचा प्रयत्न केला असता.आमच्या प्रयत्नांना प्रतिसाद न देता पसार झाले.त्याना बोलन्याचा प्रयत्न केला असता आमचे त्यांना त्यांचे आम्हाला भाषे बोलने समजतं नव्हते बहुतेक त्या तामिळ किंवा आंध्र प्रदेशातील असतील असा अंदाज आहे.त्याच्या हाव भावावरुन लोक मला दगडी मारतात असा सांगण्याचा प्रयत्न करत असत.या सर्व प्रकारची माहिती घेऊन त्वरित बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क करून सदर घटनेची माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती केली असता सहाय्यक पोलिस निरीक्षक लंगोटे साहेब यांनी भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली लंगोटे साहेब यांनी त्वरित चौधरी मॅडम, गायकवाड साहेब यांचे सहकार्याने तत्काळ पुणे येथील” आसरा अनाथांचा हक्काचा निवारा संस्थेच्या व्यवस्थापक सौ स्वातीताई डिंबळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून संपर्क साधावा असत स्वातीताई डिंबळे यांनी सदर मनोरुग्ण बेवारस महिलेला सांभाळण्यासाठीचा शब्द दिला.याकामी सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा गावडे,पै दिपक चव्हाण, आबासाहेब चौधर सहकार्य लाभले . बारामती सारख्या औद्योगिक नगरीमध्ये आणि बेवारस मनोरुग्णांना आधार मिळू शकत नाही यासारखे दुसरे दुर्दैव नाही असे सांगून पाटील म्हणाले आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एका आठवड्यात बारामती शहरातील दोन बेवारस स्थितीत जगण्याची धडपड करणाऱ्या महिलांना हक्काचा निवारा मिळवून देण्यात यश मिळाले याचे मोठे समाधान वाटते असे सामाजिक कार्यकर्ते राजू गावडे पाटील यांनी सांगितले.