फलटण दि. 29 :-
नुकतीच आषाढी वारी संपन्न झाली.दोन वर्षातुन प्रथमच या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ सोहळा पंढरपुरला गेला होता. या वर्षी वैष्णवांचा मोठा मेळा भरला होता. फलटणला दोन दीवस पालखी सोहळ्याचा मुक्काम होता.
यावेळी फलटण आगाराने 33 बसेसचा वापर करुन 43,681 जादा कीलो मिटर चालवुन20,42,747/-रुपये ऐवढे विक्रमी ऊत्पन्न आणुन22,759 भावीकांची वाहतुक करुन अनेक अडचणीवर मात करुन ऊपलब्ध चालक-वाहक कर्मचारी बंधु-भगीणी,कार्यशाळा कर्मचारी, व अधिकारी यांचे सहकार्याने विभाग नियंञक सागर पळसुले यांचे मार्गदर्शना खाली ऊत्तम नियोजन करुन जिल्यांत ऊत्पन्ना च्या बाबतीत प्रथम क्रमांक मिळवुन जील्यांत झेंडा फडकवला आहे.
एकुण ५०३ फेर्या द्वारे
₹ २०,४२,७४७/- ईतके विक्रमी ऊत्पन्न मिळवले व वारकरी भावीक-भक्तानां ऊत्तम सेवा दीली.
याबद्दल प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक,स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर,वाहतुक निरीक्षक सुहास कोरडे,सहा.वाहतुक नीरीक्षक धीरज अहिवळे यांनी सर्व कर्मचारी बंधु-भगीणी,वाहतुक नियंञक यांचे अभिनंदन केले.