बारामती:बारामती शहरातील जामदार रस्ता ते मोरगाव टोल नाका कडे जाणाऱ्या ओढ्यावर मागील वर्षी प्रशासन च्या वतीने सिमेंट चा पाईप टाकून तात्पुरती डागडुजी करून नागरिकांची येण्या जाण्याची तात्पुरती सोय केली होती परंतु गेल्या चार पाच दिवसात झालेल्या पावसाच्या पाण्याने सदर सिमेंट पाईप व तात्पुरचा केलेला सिमेंट चा गिलावा वाहून केला त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून त्या ठिकाणी प्रशासन ने पक्का व कायमस्वरूपी पूल बांधून द्यावा अशी मागणी नागरिक करीत आहे पावसाचे पाणी वाढल्यास दोन्ही बाजू कडील नागरिकाना पायी जाता येत नाही किंवा दुचाकी घेऊन जाता येत नाही रात्री च्या अंधारात या ठिकाणी अपघात होण्याच्या घटना या पूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी प्रशासना कडे त्वरित पूल बांधून देण्याची मागणी केली आहे.