
होळकर जयंती साजरी करताना तृप्ती आटोळे व इतर सहकारी
फलटण टुडे (बारामती दि १ जून २०२५):-
हिंदू संस्कृती रक्षक,उत्तम प्रशासक,जनतेच्या कैवारी म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आजही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन सावळ ग्रामपंचायत च्या सरपंच तृप्ती आटोळे यांनी केले.
सावळ ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच तृप्ती आटोळे, उपसरपंच चेतन आटोळे, ग्रा पं सदस्य लक्ष्मण (दादा) आटोळे, नितीन भिसे,फक्कड बालगुडे, मा. सरपंच विठ्ठल आटोळे,मंगलदिप पतसंस्थेचे चेअरमन जितेंद्र विरकर , दत्तात्रय पवार, मारुती आटोळे ,दत्तात्रय आवाळे, गणेश विरकर, आप्पा काशिद, सचिन आटोळे,गोरख साबळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार जितेंद्र वीरकर यांनी केले .
—————–/-