फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती, दि १९ जुलै २०२६):-
मानवबंध फाउंडेशन च्या वतीने १६ जुलै रोजी बारामती शहरात मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सुकामेव्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष सुषमा नानासो चव्हाण संस्थेच्या खजिनदार विद्या संदीप जगदाळे त् सदस्य मालन लक्ष्मण चव्हाण व संदीप आगतराव जगदाळे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
पंढरपूर कडे चालत असताना वारकऱ्यांना शाररिक ऊर्जा मिळावी,शक्ती प्राप्त व्यहावी म्हणून सुका मेवा वाटप करून व आरोग्य विषयक जण जागृती साठी पत्रके वाटप करण्यात आले.
गर्दीत, पाऊस वातावरणात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, समस्या आल्यास त्यावर उपाय आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आभार सुषमा चव्हाण यांनी मानले
मानवबंध फौंडेशन च्या वतीने सुका मेवा वाटप व आरोग्य जणजागृती

