नोंदणी मुद्रांक शुल्क दंडसवलत अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 
        सातारा, दि.23 :   नोंदणी मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. तरी थकीत मुद्रांक व शास्ती अथवा थकीत शास्ती या संबंधी पक्षकारांना 31 मार्च 2022 पूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या असतील तर त्यांनी अद्याप दंडसवलत अभय योजना 2022 लाभ घेतला नसेल तर त्या संबंधी पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रकां जिल्हाधिकारी बी.के. खांडेकर यांनी केले आहे.
पक्षकारांनी दि.31 जुलै 2022 रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजे थकीत शास्तीवरील 90 टक्के सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकीत शास्तीवर 50 टक्के दंड भरावा लागेल, असेही श्री. खांडेकर यांनी कळविले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!