कवी दिपक क्षीरसागर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या खंडाळा तालुका अध्यक्ष पदी निवड

 

फलटण : महापुरुषांचा जिवनपट आपल्या विशिष्ट शैलीत लेखनीतून, कवितेच्या माध्यमातून  विविध विषयांवर लिखाण करून अल्पावधीतच सुपरिचित झालेले  लोणंद येथील प्रसिद्ध युवा कवी दिपक क्षीरसागर यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या खंडाळा तालुका (सातारा ) अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन गोसावी, सरचिटणीस नवनाथ कोलवडकर, मालोजीराजे विद्यालय लोणंदच्या मुख्याध्यापिका सौ.सुनंदा नेवसे, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, जननायक आमदार मकरंद आबा पाटील विचार मंच लोणंद अध्यक्ष दिपक जाधव, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे फलटण तालुका उपाध्यक्ष आकाश आढाव, युवा नेते विशाल क्षीरसागर, शेखर क्षीरसागर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन खंडाळा तालुका अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली.
निवडी नंतर  दिपक क्षीरसागर यांनी गावा गावांत जाऊन विद्यार्थी व युवकांमध्ये साहित्य क्षेत्रात उर्जितावस्था निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याचे सांगितले.
सदर निवडी बद्दल कवी दिपक क्षीरसागर यांचे  साहित्य, क्षैक्षणिक, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील ‏मान्यवर व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर क्षीरसागर यांनी केले तर आभार कवी दिपक क्षीरसागर यांनी मानले..
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!