लोकशाहीचा हक्क हिसकावून घेणाऱ्या सत्तेला जेन-जी चा दणका!

फलटण टुडे वृत्तसेवा (अमोल नाळे/ जेन- जी विशेष लेख /दि २५ जुलै २०२६):-

सोनम वांगचू आणि CJP कॉक्रोच जनता पार्टी यांचे गेली महिनाभरापासून सुरू असलेले आंदोलन आणि त्याला दडपशाहीने चिरडण्याचा प्रकार सोशल मीडियातून पाहिलेले मुलांच्या वरील लाठीचार्ज, छऱ्याच्या बंदुकीचा वापर,अश्रुधारांच्या नळकाड्यांचा वापर यामुळे हे आंदोलन थांबते आहे की काय अशी भीती निर्माण झाली होती. पण आजच्या भारतातील सामाजिक आणि राजकीय वातावरणात तरुणाईची भूमिका दिवसेंदिवस अधिक निर्णायक ठरत गेली . विशेषतः जेन-जी म्हणून ओळखली जाणारी नवी पिढी आपल्या हक्कांबाबत, स्वातंत्र्याबाबत आणि लोकशाही मूल्यांबाबत पूर्वीपेक्षा अधिक जागरूक होताना दिसत आहे. अन्याय, असमानता, दडपशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येणाऱ्या मर्यादांविरोधात ही पिढी आता केवळ सोशल मीडियावर व्यक्त होत नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आपला आवाज बुलंद करत आहे.

बदलत्या काळाची नवी तरुणाई

जेन-जी ही तंत्रज्ञानाच्या युगात वाढलेली पिढी आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे जगभरातील घडामोडींची माहिती या पिढीला काही क्षणांत मिळते. त्यामुळे कोणत्याही निर्णयाचा परिणाम, प्रशासनाची भूमिका किंवा सत्तेचे धोरण यावर ही पिढी तात्काळ प्रश्न उपस्थित करते.“प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा आत्मा आहे,” हे या पिढीने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. सत्ता कोणाचीही असो, निर्णय जनतेच्या हक्कांवर परिणाम करणारा असेल तर त्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार नागरिकांना आहे, असा स्पष्ट संदेश जेन-जी देत आहे.लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नव्हेत. लोकशाही म्हणजे नागरिकांना मिळालेले मूलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याचा अधिकार, शांततामय मार्गाने विरोध करण्याचा अधिकार आणि सत्तेला जाब विचारण्याची क्षमता.जेव्हा या अधिकारांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक होणे गरजेचे असते. आजची जेन-जी हीच भूमिका बजावताना दिसते. ती म्हणते “आमचा आवाज दाबता येणार नाही, आमचे प्रश्न थांबवता येणार नाहीत,आणि आमचे लोकशाही हक्क हिरावून घेता येणार नाहीत!”ही भूमिका केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून लोकशाही व्यवस्थेवरील विश्वासातून निर्माण झालेली आहे.

सोशल मीडिया ते रस्त्यावरचा संघर्ष

जेन-जीच्या आंदोलनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या वरती होणारी टीका की हे फक्त सोशल मीडिया वरतीच व्यक्त होतात हे शॉर्ट मधे मॅसेज पाठवतात आणि याना बोलायलाही वेळ नाही तीस सेकंदाची रील काडणे वेडेच यांचे काम पण ही पिढी तिची डिजिटल आणि प्रत्यक्ष चळवळ यांची सांगड. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादा प्रश्न काही तासांत देशभर पोहोचतो. हॅशटॅग, व्हिडिओ, पोस्ट आणि ऑनलाइन चर्चांमधून तरुणाई आपली भूमिका मांडते. मात्र केवळ ऑनलाइन चर्चा करून थांबणे हा या पिढीचा स्वभाव नाही. गरज भासली तर हीच तरुणाई रस्त्यावर उतरते, शांततामय आंदोलन करते आणि लोकशाही मार्गाने आपला विरोध नोंदवते. यामुळेच सत्ताधाऱ्यांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे. पूर्वी माहितीवर नियंत्रण ठेवून जनमतावर प्रभाव टाकणे तुलनेने सोपे होते. मात्र आजची तरुणाई प्रश्न विचारते, माहिती तपासते आणि स्वतःची भूमिका तयार करते.या मुळे त्यांच्यावरील होणारे आरोप त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून खोडून काढलेले आहेत.

जेन -जी ची सत्तेला जाब विचारण्याची ताकद

आजच्या आंदोलनात लोकशाहीमध्ये सत्ता ही जनतेच्या विश्वासातून निर्माण होते. त्यामुळे सत्तेवर टीका करणे, निर्णयांवर प्रश्न विचारणे किंवा धोरणांविरोधात आंदोलन करणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. जेन-जीचा संघर्ष कोणत्याही एका पक्षाविरुद्ध नसून, सत्तेच्या मनमानीविरुद्ध आहे. सत्ताधारी कोणतेही असोत जनतेचे अधिकार, स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्ये यांचे रक्षण करणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे.हे पाहायला मिळाले.आजची तरुणाई हे सांगायलाही मागे- पुढे पाहात नाही “सत्ता बदलू शकते; सरकारे बदलू शकतात; पण लोकशाहीचे अधिकार कायम राहिले पाहिजेत!” आणि “झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये” याची खात्री या आंदोलनाने पाहिला मिळाली

आंदोलनाचा नवा चेहरा व त्याचे बदलते स्वरूप

आजच्या आंदोलनांना पारंपरिक नेतृत्वाची गरज असतेच असे नाही. सोशल मीडिया, डिजिटल संवाद आणि सामूहिक नेतृत्वामुळे अनेक तरुण स्वतःच आंदोलनाचा चेहरा बनतात.आम्ही पत्रकार या नात्याने काम करत असताना मुद्रण माध्यमे व इलेक्ट्रॉनिक माध्यमे याना काही बांधणे किवा कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागते त्याना देशाच्या प्रमुख पदावरील व्यक्ती ची गरिमा सांभाळावी लागते. आंतरराष्ट्रीय स्थरावरती या गोष्टीमुळे देशाची बदनामी होऊ नये याची काळजी घेतली जाते. ज्या गोष्टी सोशल मीडियात म्हणजेच इंस्टाग्राम यावरील दाखवताना त्याना कोणतीच बंधने नसतात त्यामुळे जे प्रसारमाध्यमे दाखाऊ शकत नाही त्या गोष्टी सोशल मीडिया द्वारे प्रसारित होतात आणि लोकांन पर्यंत पोहचतात जेन-जीचे आंदोलन हे एका व्यक्तीपुरते मर्यादित नसते. ते एका विचाराचे, एका प्रश्नाचे आणि एका सामूहिक भावनेचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळेच या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत गेला व हे आंदोलन युवा आंदोलन म्हणून पुढे आले काळ बदलला आहे आजची तरुणाई राजकारणाकडे केवळ निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. ती शिक्षण, रोजगार, पर्यावरण, पारदर्शकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय ,आपले हक्क जर कोण हिरावून घेत असेल तर त्यावर रस्त्यावरील लढाई करण्यास ते तयार असतात व न्याय, हक्काच्या प्रश्नांनाही लोकशाहीच्या केंद्रस्थानी ठेवते.ते व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस करतात.

लोकशाही वाचवण्याची जबाबदारी सर्वांची

जेन-जीचा आवाज हा केवळ तरुणांचा आवाज नाही. तो लहानान पासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचा आवाज आहे. लोकशाही टिकवण्यासाठी प्रश्न विचारणारे नागरिक, स्वतंत्र माध्यमे, जागरूक समाज आणि जबाबदार सत्ता आवश्यक असते.जर नागरिकांनी प्रश्न विचारणे थांबवले, तर लोकशाही कमकुवत होते. म्हणूनच जेन-जीचा हा संघर्ष समाजासाठी एक महत्त्वाचा इशारा आहे.हे लक्षात घेतले पाहिजे.या आंदोलनातून हे स्पष्ट लक्षात आले की “लोकशाही ही कोणाची मक्तेदारी नाही; ती जनतेची संपत्ती आहे.आणि जनतेचा आवाज कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही!”जेन-जीचा दणका हा केवळ एका आंदोलनाचा आवाज नाही. तो बदलत्या भारताचा संकेत आहे. ही पिढी शांत बसणारी नाही, प्रश्न न विचारता निर्णय स्वीकारणारी नाही आणि आपल्या अधिकारांवर गदा आली तर गप्प राहणारीही नाही.लोकशाहीच्या हक्कांवर कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर जेन-जीचा आवाज अधिक बुलंद होणार आहे. “हक्क आमचा… आवाज आमचा…लोकशाहीही आमचीच!”

लोकशाहीचा हक्क हिसकावून घेणाऱ्या सत्तेला जेन-जीचा दणका!

श्री अमोल सुलोचना रामचंद्र नाळे (सर)
संस्थापक संपादक, साप्ताहिक फलटण टुडे
मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,फलटण

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!